विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे

 विविध शाकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा – श्री राजेश धुर्वे


जोपर्यंत शेतकरी
 एकत्रित येऊन व्यवसाय करत नाहीत तोपर्यंत शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकत नाही असे अभिमत नांदेड जिल्ह्य नाबार्डचे  जिल्हा विकास व्यावास्थापक श्री राजेश धुर्वे यांनी दिले.  ते संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्रांतर्गात स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्याच्या आढावा वैकीत बोलत होते. नाबार्ड सहाय्यित १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या कंपन्यासाठी शासनाच्या विविध योजना गावाच्या विकासासाठी घेतल्या पाहिजेत आणि शेतकर्यांना गावातच शेतीविषयक सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहनही केले.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यावस्थापक श्री गणेश पठारे, यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि बँकेचे कर्ज मिळण्यासाठी योग्य ती पत शेतकरी ठेवत नाहीत त्यामुळे कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होतो यासाठी कर्जा बाबत सर्वाना जागृत केले पाहिजे आणि परतफेड करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

डॉ सुरेश कुलकर्णी, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांनी शेतकऱ्यांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला असल्याचे सांगून कृषी विनिष्ठ पुरवठा करण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत असल्याचे सांगितले.

श्री रोहित देशमुख, संचालक संस्कुती संवर्धन मंडळ सगरोळी यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व कंपन्यांच्या पदाधिकाऱ्याना कामात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या

नाबार्ड सहयीत १३ शेतकरी उत्पादक कंपन्याचा अहवाल प्रत्तेक कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मांडला आणि योग्य त्या सूचना उपस्थित मान्यवरांनी केल्या.




Comments

Popular posts from this blog

अटकळी येथील बायोलॅब व जिरेनियाम प्लांट ला महिला बचत गटांची भेट…

किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन करावे

परसबागेतील कुक्कुटपालन करा आणि घराला आर्थिक हातभार लावा